सावधान! पुढील ७२ तासांत ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार
Maharashtra Weather | राज्यातील अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवू लागला असला तरी येत्या ७२ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत असून उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट होत नाही. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असून विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.
हेही वाचा – लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा निर्णय, पेट्रोल आणि डिजेलच्या दरात कपात
या जिल्ह्यांना तुफान पावसाचा इशारा :
IMD अंदाजानुसार, उद्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो. याशिवाय खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.