जयंत पाटील अजित पवारांच्या संपर्कात? अमोल मिटकरी म्हणाले..
![Amol Mitkari said this in contact with Jayant Patil Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/jayant-patil-and-ajit-pawar-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असं प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावरून अजित पवार गटातली आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, जयंत पाटील हे मोठे नेते आहेत. परंतु, त्यांचा दावा कितपत खरा आहे हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. आज १९ ऑक्टोबर ही तारीख आहे. येत्या २५-२६ ऑक्टोबरपर्यंत जयंत पाटलांचं वक्तव्य किती खरं आहे ते स्पष्ट होईल. आमचे १५ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत की त्यांचाच मोठा नेता आमच्या संपर्कात आहे याचं खरं चित्र लवकरच महाराष्ट्रासमोर येईल. येत्या पाच ते सात दिवसांत महाराष्ट्रासमोरचा संभ्रम दूर होईल. कोणाचे किती आमदार कोणाच्या संपर्कात आहेत त्याबाबतचा संभ्रम राहणार नाही.
हेही वाचा – ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा; म्हणाले, ललितला उद्धव ठाकरेंनी..
शरद पवार यांनी गुरुवारी (१८ ऑक्टोबर) लोकसभा निवडणुकीसाठी आढावा बैठक घेतली. या बैठकीला केवळ मानसिंह नाईक हे एकमेव आमदार उपस्थित होते. एकटे मानसिंह नाईक बैठकीला गेले असतील आणि त्यावरून जयंत पाटील यांनी १५ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा कयास लावला असेल तर तो चुकीचा आहे. त्याचबरोबर मानसिंह नाईक हे मुळातच सुरुवातीपासून शरद पवारांच्या गटात आहेत. मी पूर्ण विश्वासाने सांगतोय, येत्या पाच ते सात दिवसांत महाराष्ट्रासमोर दूध का दूथ आणि पाणी का पाणी’ होईल, असंही अमोल मिटकरी म्हणाले.