‘भाजपची बी टीम तयार’; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची टीका!
मुंबई : केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छआ व्यक्त केली होती. दरम्यान, यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधून डॉ. भागवत कराड यांना निवडून आणायचं असेल तर इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणं आवश्यक आहे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. यावरून आता काँग्रेसने भाजप आणि इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसेच काँग्रेसने म्हटलं की, भाजपाने कशी बी टीम तयार करून ठेवली आहे याची जाहीर कबुलीच रावसाहेबांनी दिली आहे.
हेही वाचा – पुणेकरांनो काळजी घ्या! डोळ्याच्या साथीचे रोज ५०० पेक्षा जास्त रूग्ण, अशी घ्या काळजी..
भाजपने कशी B टीम तयार करून ठेवली आहे याची जाहीर कबुलीच रावसाहेबांनी दिली! pic.twitter.com/rZ75mq0tHt
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) August 23, 2023
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना ३ लाख ८८ हजार ७८४ मतं मिळाली होती तर प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना ३ लाख ८४ हजार ५५० मतं मिळाली होती. अवघ्या ४ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. यावेळी भाजपने शिवसेनेला मदत केली नव्हती असा आरोप केला जातो. त्यामुळे एमआयएमला काँग्रेसने भाजपची बी टीम म्हटलं आहे.