‘सावरकरांवर बोलणं थांबलं नाहीतर गांधींची १०० पापं समोर आणू’; आनंद दवेंचं वक्तव्य
देशात दुसरा गोडसे परवडणार नाही
![Anand Dave said that talk about Savarkar should be stopped or Gandhi's 100 sins will be brought to light](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/rahul-gandhi-and-anand-dave-780x470.jpg)
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, पुण्यातील हिंदू महासंघ देखील आक्रमक झाला आहे.
आम्ही महात्मा गांधी यांच्याबाबत आदर ठेवून होतो. पण सातत्याने सावरकरांविषयी बोललं जातं. हे बोलणं थांबलं नाहीतर मग महात्मा गांधीची १०० पापं आम्ही समोर आणू. फाळणीचा इतिहास समोर आणू, हिंदूंचा झालेला नरसंहार हे सगळं बाहेर काढू. त्यांच्याविषयीची पुस्तकंही छापू, असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
या देशात दुसरा गोडसे परवडणार नाही. गांधी होते म्हणून गोडसे तयार झाले. इंदिरा गांधींनी ११ हजारांची देणगी सावरकर प्रतिष्ठानसाठी दिली होती. इंदिरा गांधींचा अभ्यास केला असता तर राहुल गांधींनी मुर्खपणाची वक्तव्य केली नसती, असंही आनंद दवे म्हणाले.