TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपुणे
अर्थव्यवस्थेवरून प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका
1 जानेवारी शौर्यदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. नागरिकांना घरातूनच विजय स्तंभाला अभिवादन करण्याचे आवाहन आंबेडकरांनी केले.
यावेळी बोलताना आंबेडकरांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला. अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे कोणतीही योजना नसल्याचे म्हणत त्यांनी टीका केली.
केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी बदलली पाहिजे याबद्दल कोणतीही योजना नाही. कदाचित त्यांच्याकडे योजना असती तर करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करु शकलो असतो. पण लोकं काय निर्णय घेतला पाहिजे हे सांगत आहेत. पण शासन काय निर्णय घ्यायचा हे ठरवत नाहीये. दुर्दैवाने सरकार फक्त आदेश काढत आहेत, अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.