GOOD NEWS : 2020 च्या अखेरपर्यंत भारतीयांना मिळणार मेड इन इंडियाची कोरोना लस – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
नवी दिल्ली – भारतासह जगभरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाने सर्व जगात हाहाकार माजवला असून, दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. भारत कोरोना रुग्णांची रोजच विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पुन्हा 70 हजारांच्या संख्येने देशात कोरोनाबाधित आढळले आहेत. या भयावह अशा कोरोना विषाणू भारतात कित्येक लोकांना ग्रासलं आहे. तर अनेक जणांना या विषाणूमुळे आपला जिव सुद्धा गमवावा लागला आहे.
अशातच या महाभयावह विषाणूमात करण्यासाठी कोरोनाची लस कधी येते यावर आता प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. कोरोना लसीवर जगभरात सुमारे 150 हून अधिक देशांचे संशोधन सुरू आहे. अशातच रशियाने जगातील पहिली कोरोनाची लस तयार करण्याचा दावा देखील केला आहे. मात्र, भारतात कोरोनाची लस कधी येणार याकडे आता भारतीयांचे लक्ष लागले आहे.
देशात कोरोना लसीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात कोरोनाची लस ह्या वर्षीच्या शेवटपर्यंत अर्थात 2020 संपण्याच्या अगोदर येऊ शकते. देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 7 जानेवारी 2020 ला सापडला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही कोरोनाविरूद्ध धोरण तयार केले होते. पुढे हर्षवर्धन म्हणाले की, देशातील कोरोना लसीची चाचणी ही अंतिम टप्प्यात असून, पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये भारतीयांसाठी ती उपलब्ध होणार आहे. देशात सध्या तीन कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे.