भारतात गेल्या 24 तासात 396 कोरोनाचे बळी, तर कोरोनाबाधितांच्या संख्येत 10 हजार 956 ने वाढ
भारतात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या आणि त्याचसोबत मृतांची संख्या वाढतच चालली आहे.देशात गेल्या 24 तासात 396 बळी गेले तर कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची 10 हजार 956 ने वाढ झाली आहे.त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 97 हजार 535 झाली आहे. यातील 1 लाख 47 हजार 195 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 49.47 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले 1 लाख 14 हजार 842 रुग्ण देशात आहेत.
गेल्या 24 तासांत 6 हजार 165 रुग्ण बरे झाले तर 396 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . देशात एकूण बळींची संख्या 8 हजार 498 झाली आहे. या महिन्याच्या 1 तारखेला कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 90 हजार 535 होती. 9 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित वाढण्याचा 4 जूनपासून सलग नववा दिवस आहे.
महाराष्ट्रात काल 3607 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. राज्यात 97 हजार 648 इतकी कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1561 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 46 हजार 078 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता राज्यात 47 हजार 968 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 152 रुग्णांचा मृत्यू झाला, या बाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.