#CoronaVirus:धारावीतून २१ जण इस्लामपुरमध्ये दाखल
सांगली :– मुंबईत कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी ‘कोरोना कॅपिटल’ म्हणून ओळखली जात आहे. धारावीत कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहे. धारावीत कोरोनाबाधितांची संख्या ही १४२५ वर पोहोचली आहे. धारावीच्या झोपडपट्टीतुन २१ जण सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर मध्ये आल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यामुळे आता सांगलीत भीतीचं वातावरण आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने अत्यंत धोकादायक बनलेल्या मुंबई येथील धारावी झोपडपट्टीतून २१ लोक अचानक इस्लामपूर शहर आणि वाळवा तालुक्यात आले आहेत. यामुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे.
बेकायदेशीर सांगली जिल्ह्यात आलेल्या प्रकरणी दोन जणांवर इस्लामपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जण इस्लामपुरमध्ये आले होते तर १६ जण हायवेवर थांबले होते. २१ पैकी २० जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. सर्व लोकांना मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये इंश्ंट्यूशन क्वारंटाइन केलं आहे.