breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
कर्जमाफीचे ग्रँड सेलिब्रेशन, शिवसेनेकडून शेतकऱ्यांना 100 किलो पेढे वाटप
बीड | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (21 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या पहिल्याच निर्णयाचं बीड जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. आज (22 डिसेंबर) आठवडी बाजाराचे निमित्त साधून शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बाजारातील शेतकऱ्यांना तब्बल 100 किलो पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे अनोखे स्वागत केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी काल दिली.