भारत – बांगलादेशची आजची बैठक शेवटच्या क्षणी रद्द
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/india-bangladesh-flag-Frame-copy-2.jpg)
महाईन्यूज|
भारत व बांगलादेश यांच्यात आजपासून संयुक्त नद्या आयोगाच्या चर्चेला सुरूवात होणार होती, मात्र शेवटच्या क्षणी बांगलादेशकडून ही चर्चा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या मागे सहा सामाईक नद्यांवर माहितीच्या देवाणघेवाणीत विलंबाचे कारण सांगितले जात आहे. ही माहिती ३४ वर्षे अगोदर अद्यावत करण्यात आलेली होती. बांगलादेशमधील माध्यमांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलेले आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने या आठवड्या भारताबरोबर होणाऱ्या दोन्ही बैठका स्थगित केल्या असल्याची माहिती समोर येत आहे व या बैठका गुरूवार व शुक्रवारी होणार होत्या.
भारत आणि बांगलादेश दरम्यान वाहणाऱ्या नद्या संबंधी असलेल्या विवादांवर आज दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार होती. हे विवाद सोडवण्यासाठीच या आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्या लागू झाल्यापासून बांगलादेशची वागणूक बदललल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच बांगलादेशकडून आजची बैठक रद्द करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.