विश्वाच्या सुखी संसारासाठी छत्रपती संभाजी महाराज हवेत, बुध्द नव्हे – मनोहर भिडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Sambhaji-Bhide10.jpg)
मुंबई, महाईन्यूज
वादग्रस्त वक्तव्य करत सतत चर्चेत राहिलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावर आक्षेप घेत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विश्वाचा संसार सुखाने चालण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज हवेत, बुध्द नव्हे, असे विधान त्यांनी केले आहे. मोदींचं वक्तव्य चुकीचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये भिडे यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. संभाजी भिडे यांनी सांगलीतील शिवप्रतिष्ठानच्या वतीने तरूणांमध्ये हिंदू धर्माविषयी जागृती व्हावी, यासाठी १९८२ मध्ये त्यांनी दुर्गामाता दौड सुरू केली.
भिडे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चुकीचं बोलले. त्यांची चुक महाराष्ट्र दुरूस्त करू शकतो आणि ते काम आपलं आहे. देशाने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवेत,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिल्याचे ते म्हणाले होते. तसंच भारताने कायमच जगाला एकत्र राहण्याचा आणि शांतीचा संदेश दिला असल्याचेही ते म्हणाले होते.