breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडाराजकारण

सुरतच्या कोणत्याही बिळात लपलात तरी 5 जूननंतर तुम्हाला उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे

सुरतच्या कोणत्याही बिळात लपलात तरी 5 जूननंतर तुम्हाला उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे

धुळे : ”5 जूनला दिल्लीत व महाराष्ट्रात आपलं सरकार येणार आहे. त्यानंतर तुम्ही सुरतच्या कोणत्याही बिळात लपलात तरी तुम्हाला उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंध्यांना दिला आहे. धुळे येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप व मिंधे सरकारची सालटी काढली.

”भाजपवर आई वडिलांनी संस्कार केले की नाही असा प्रश्न सध्या पडत आहे. किती खालच्या स्तरावर जाऊन, वेडेवाकडे बोलत आहेत सध्या भाजपची लोकं. पंतप्रधान मोदींनी एका सभेत बोलताना मनमोहन सिंह रेनकोट घालून आंघोळ करतात असं म्हटलं होतं. पवार साहेबांना भटकती आत्मा बोलले. मोदीजी ही शिवछत्रपती व जिजाऊंची माती आहे. या मातीत आम्ही आमच्या मुलांवर असे बोलायचे संस्कार करत नाही. भाजपचे सुधीर मुनगंटीवार इतक्या नीचपणे,बिभत्सपणाने, विकृतपणे बहिण भावाच्या नात्यावर बोलले. बहिण भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करतायत हे लोक आणि यांच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं. म्हणे मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे. अरे इथे यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत. क्रिडापटू आंदोलनाला बसलेल्या तिथे तुम्ही गेला नाहीत, मणिपूरमधल्या महिलांची धिंड काढल्यानंतर त्यांना भेटायला कुणीही गेले नाही. कर्नाटकात प्रज्वल रेवण्णाच्या प्रचाराच्या वेळी मोदी म्हणाले होते की रेवण्णाला मत म्हणजे मला मत, मग त्याने केलेले गुन्हे मोदींच्या माथी मारले पाहिजेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”जळगाववरून हेलिकॉप्टरने आलो. त्यावेळी मी बघितलं संपूर्ण धुळं रखरखीत झालेलं आहे. दहा वर्ष झाले इथे एकच खासदार आहे धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले आहेत त्यांनी. इथे कांदा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची निर्यातबंदी उतरवत नाही. गुजरातच्या शेतकऱ्यांची उठवली. असा भेदभाव का करता. मोदीजी गेल्या दोन वेळेला महाराष्ट्राने तुम्हाला चाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून दिलेले. म्हणून तुम्ही दिल्लीत गेले होतात. पण यावेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली पर्यंत पोहचू देणार नाही. ४ जूनला तुमची एक्स्पायरी डेट आहे. या 4 जूनला बुरसटलेल्या भाजपला जनता केराच्या टोपलीत टाकणार आहेत आणि 5 जूनला आमचं सरकार आलेलं असेल. त्यानंतर तुम्ही कोणत्याही बिळात लपा. सुतरच्या बिळातही लपलात तरीही तुम्हाला उलटं लटकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button