‘काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत…’; मंत्री नितेश राणेंची टीका

Nitesh Rane : काँग्रेस आणि मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत तर आपण लाबून हसणं बरोबर आहे, अशा शेलक्या शब्दात टीका करत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी निशाणा साधला आहे. माविआत राज ठाकरेंना सोबत घेण्याच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध केला असून मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. या काँग्रेसच्या भूमिकेवर मंत्री नितेश राणेंनी टीका केली आहे. तर काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर मुंबईत त्यांनी स्वबळावर निवडणुका लावून दाखवाव. ते नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार वेगळं, वर्षा गायकवाड वेगळं बोलणार, तर तिकडे अस्लम शेख वेगळं बोलणार. मात्र हे सगळं मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्यासाठी हे कार्यक्रम आहेत. काँग्रेसची भाषा ही जिह्याद्यांची भाषा आहे. त्यामुळे काँग्रेसवर मुंबईसह, राज्यात, देशात कुणाचाही विश्वास राहिला नाही. अशी बोचरी टीकाही मंत्री नितेश राणेंनी यावेळी केली. ते सिंधुदुर्ग येथे बोलत होते.
देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सैनिक शाळा सुरू होतेय, हि जिल्हासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या शाळेच्या माध्यमातून भविष्यात अनेक सैनिकांसह मोठे अधिकारी त्यातून तयार होतील. हा विश्वास आहे. असेही मंत्री नितेश राणे म्हणाले. तर जनतेशी नाळ नसलेले आणि देशासाठी पर्यटक असलेले, देशाची बदनामी करतात. पुन्हा परदेशात जातात. अर्धवेळ राजकारणी आहेत. 100 टक्के भारतीय म्हणायचे का हा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारलं, अशी टीका करत मंत्री नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. एका बाजूला वोट चोरीची बोंब आणि दुसरीकडे लोकशाहीची थट्टा करायची, ही राहुल गांधींची सवय झाली आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या एनडीएला बिहारच नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा – …अन्यथा मोठा निर्णय! शिंदेसेनेची छत्रपती संभाजीनगरमध्ये गुप्त बैठक; भाजपसमोर ठेवणार ‘हा’ प्रस्ताव
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची रमेश चेन्नीथाला यांनी सांगितले. मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा इतर कोणासोबत न जाण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. . काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे.




