TOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

पतंजलीच्या शेअरने उर्वरित एफएमसीजी दिग्गजांच्या तुलनेत चांगले रिटर्न

शेअर बाजारात पतंजलीने दिग्गजांना केले धाराशाही

राष्ट्रीय : शेअर बाजारात जेव्हापासून पंतजली फूट्सने पाऊल ठेवल्यापासून आतापर्यंत कंपनीने गुंतवणूकदारांना ५५ टक्क्यांहून अधिक कमाई करुन दिली आहे. हा आकडा गेल्या ५ वर्षांपासूनचा आहे. खास बाब म्हणजे एवढा रिटर्नतर देशाची दिग्गज एफएमसीजी कंपन्या देखील देऊ शकल्या नाही. ज्यात हिंदुस्तान यूनिलिव्हर, नेस्ले आणि डाबर या कंपनीचे नाव घेऊ शकता.

एवढेच काय एचयूएल आणि डाबर इंडियाने गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. तर नेस्ले इंडियाने ५ वर्षात ३९ टक्क्यांहून जास्त कमाई करुन दिली आहे. पतंजलीने आपला व्यवसाय खूप वाढवला आहे. येत्या काही दिवसात पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये मोठी वाढ पाहायला मिळू शकते. चला तर पाहूयात अखेर गेल्या ५ वर्षांत देशाच्या दिग्गज एफएमसीजी कंपन्यांच्या तुलनेत शेअर बाजारात कशा प्रकारचे आकडे पाहायला मिळाले.

पतंजलीचा 5 वर्षांचा रिटर्न
गेल्या ५ वर्षात पतंजली फूड्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिग्गज कंपन्यांच्या तुलनेत चांगले रिटर्न दिले आहेत. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकड्यांना पाहिले तर पतंजली फूड्सच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे ५७ टक्के रिटर्न दिला आहे. ५ वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर सुमारे ३४७ रुपये होता. तेव्हा पासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये १९७ रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्याच्या काळात कंपनीचे शेअर ५४४.१० रुपयांवर कामकाज करत आहेत. जे आपल्या ५२ आठवड्यांच्या लोअर लेव्हल ५२१ रुपयांच्या चांगल्या स्थितीत आहे. जानकाराच्या मते येत्या काही दिवसात पतंजलीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते.

हेही वाचा –  रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सोडण्यास मान्यता; जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री विखे पाटलांच्या सूचना

हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या शेअरची घसरण
तर देशाची सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्तान यूनिलिव्हरच्या शेअर्समध्ये या ५ वर्षांत घसरण पाहायला मिळाली आहे. आकड्यांना पाहिले तर एनएसईमध्ये कंपनीचा शेअर ५ वर्षात चार टक्क्यांच्या घसरणीसह कामकाज करत आहे. खास बाब म्हणजे कंपनीचा शेअर्स गेल्या ५ वर्षांपासून २१०० रुपये ते २२०० रुपयांच्या रेंजमध्ये कामकाज करत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीच्या शेअरने जरुर २९०० रुपयांच्या लेव्हल पार केली, परंतू त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.

डाबरच्या शेअरने झाले नुकसान
तर डाबरच्या शेअरने देखील गुंतवणूकदारांचे नुकसान केले आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षात ८ टक्क्यांहून जास्त घसरण पाहायला मिळाली आहे. आकड्यांना पाहिले तर सध्याच्या वेळी कंपनीचा शेअर ८ टक्क्यांच्या घसरणीसह ४९०.१० रुपयांवर कामकाज करत आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये कंपनीचा शेअर जरुर ६७० रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर त्याच्या खूप घसरण पाहायला मिळाली आहे, खास बाब म्हणजे कंपनीचे शेअर ५ वर्षांपूर्वी ५३४ रुपयांहून जास्त कामकाज करत होते. तेव्हापासून यात ४४ रुपयांहून जास्त घसरण पाहायला मिळाली आहे.

नेस्ले इंडिया देखील मागे
तसे पाहिले तर गेल्या ५ वर्षात भलेही नेस्ले इंडियाने गुंतवणूकदारांना पॉझिटीव्ह रिटर्न दिला असला तर तो पतंजलीच्या तुलनेत कमी आहे. आकड्यांचा विचार करता गेल्या ५ वर्षात पतंजलीने गुंतवणूकदारांना ३९ टक्के रिटर्न दिला आहे. तसे सध्याच्या काळात कंपनीचा शेअर १,२३८.७० रुपयांवर कामकाज करत आहे. या दरम्यान कंपनीचे शेअरमध्ये सुमारे ३५९ रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे. तसेच सप्टेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात कंपनीचे शेअर सुमारे १४०० रुपयांवर पोहचले होते. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये खूपच चढउतार पाहायला मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button