breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘या’ आयर्वेदिक औषधाने कोरोना लगेच बरा होतो, आंध्र प्रदेशमध्ये लोकांच्या रांगा; आयसीएमआर करणार तपासणी

नेल्लोर – कोरोनावर जालीम इलाज शोधण्यासाठी जगभर संशोधन होत असलं तरीही आंध्र प्रदेशच्या एसपीएस नल्लोर जिल्ह्यात कोविडविरोधातील औषधासाठी रांग लागलेली आहे. या औषधामुळे झटक्यात कोरोना रुग्ण बरा होतो असा समज आजूबाजूच्या गावात पसरला आहे. हे एक आयुर्वेदिक औषध असून ी आनंदय्या नावाच्या वैद्याने हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला, परिणामी इथे दूरुन लोक येऊ लागले. इतकंच नाही तर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत. आनंदय्या यांनी तयार केलेल्या औषधाची तुलना हैदराबादमधील बथिनी बंधूंनी दमा बरा करण्यासाठी तयार केलेल्या ‘फिश प्रसादम’ औषधासोबत केली जात आहे.

दरम्यान हे आयुर्वेदिक औषध कोविड-19 वर प्रभावी आहे का, यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो का हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तरीही मोठ्या संख्येने नागरिक या गावात औषधासाठी गर्दी करत आहेत. परंतु हे औषध घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचा मात्र पुरता बोजवारा उडाला.

औषधासोबत आयड्रॉपही

कृष्णपट्टणम कोरोना औषध असं या आयुर्वेदिक औषधाचं नाव आहे. आनंदय्या आपलं आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. शिवाय ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना आयड्रॉप देखील दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. तर गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आलं आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिल्या जातात. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही या गोळ्या दिल्या जात आहेत.

उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून औषधाबाबत माहिती
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी कोविड-19 संबंधित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तर हे औषध प्रभावी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीएमआर आणि तर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितलं.

हे औषध कोविड-19 वर प्रभावी आहे की नाही, तसंच हे औषध बनवण्याची कृतीच्या संशोधनासाठी आंध्र प्रदेश सरकारने तज्ज्ञांचं पथक तसंच आयसीएमआरची एक टीम नेल्लोरला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचाही औषधाचा अभ्यास करण्याचा सल्ला
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही केंद्रीय आयुष मंत्री आणि आयसीएमआरला या औषधावर संशोषन करायला सांगितल्याचं कळतं. व्यंकय्या नायडू देखील एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील आहेत.

औषधाचे दुष्परिणाम नाही; आमदार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
ज्यांनी हे औषध खाल्लं किंवा वापरलं त्यांच्यात कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत, असं आमदार के गोवर्धन रेड्डी यांनी सांगितलं. तर दुसरीकडे जिल्हा पंचायत अधिकारी धनलक्ष्मी याच्या नेतृत्त्वाखाली नेल्लोरचे जिल्हाधिकारी के व्ही एन चक्रधर बाबू यांनी एका समितीची नेमणूक केली असून त्यात आयुष डॉक्टर आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय ज्या रुग्णांनी या औषधाचं सेवन केलं, त्यांच्यात दुष्परिणाम दिसले नाहीत, असंही म्हटलं. दरम्यान या औषधाचे नमुने तपासणीसाठी हैदराबादमधील आयुष प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button