breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

नवा पक्ष काढणार की कुणाशी घरोबा करणार? संभाजीराजे म्हणाले, ३ मे नंतर राजकीय दिशा जाहीर करतो!

कोल्हापूर |

येत्या ३ मे रोजी माझ्या खासदारकीचा कार्यकाळ संपतो आहे. ३ मे नंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन, ती नक्कीच वेगळी असेन, असं मोठं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर राजे भाजपत प्रवेश करणार, सेना-राष्ट्रवादीकडे जाणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय. संभाजीराजे छत्रपती यांनी मतदानाचा अधिकार बजावला. जवळपास ३० सेकंद विचार करुन मी कुठे मदतान करायचा हा निर्णय घेतलं, असं संभाजीराजेंनी सांगितलं. यावेळी खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर तुमची राजकीय भूमिका काय असेल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर, ३ मे नंतर मी माझी राजकीय दिशा स्पष्ट करेन, ती नक्कीच वेगळी असेन, असं मोठं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं. संभाजीराजेंच्या शब्दाला मराठा समाजात विशेष मान आहे. त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्यांच्या एका हाकेला ओ देण्यासाठी हजारो तरुण तयार असतात. त्यांचे नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्यदेखील कमालीचं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे नव्या पक्षाची घोषणा करणार की सेना-भाजप-राष्ट्रवादीशी घरोबा करणार, हे ३ मे नंतरच स्पष्ट होईल. छत्रपती संभाजीराजे पुढची राजकीय दिशा काय ठरवतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button