Uncategorized

सर्वत्र उन्हाचा तडाखा ,उन्हाळ्यात आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

तीव्र सूर्यप्रकाशामुळे घाम येणे आणि शरीरात पाण्याची कमतरता यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

पुणे : सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या शरीराची विशेष काळजी घेत असतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या ऋतूत आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण तीव्र सूर्यप्रकाशामुळे घाम येणे आणि शरीरात पाण्याची कमतरता यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे आणि अनेक प्रकरणांमध्ये ही समस्या गंभीर देखील होऊ शकते.

उन्हाळ्यात जास्त करून डिहायड्रेशनची समस्या खुप निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी तुमच्या आहाराकडे लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. काही पेये आणि फळे खाऊन तुम्ही तुमचे शरीर हायड्रेट ठेवू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आवडीनुसार या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करू शकता.

हेही वाचा –  उन्हाळी सुट्टीला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एसटीच्या ७६४ अतिरिक्त फेऱ्या

नारळ पाणी
जसा उन्हाळा सुरू होतो, तेव्हा नारळ पाणी सर्वाधिकरित्या प्यायले जातात. अशातच नारळ पाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचे स्रोत मानले जाते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होऊ शकते. उन्हाळ्यात ते प्यायल्याने शरीर ताजेतवाने होते आणि डिहायड्रेशन टाळता येते. याशिवाय नारळ पाणी पोटाच्या समस्या देखील दूर करते.

टरबूज
टरबूज खाणे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यात 90% पेक्षा जास्त पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर असतात. टरबूजमध्ये कॅलरीज देखील कमी असतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते.

काकडी
काकडी देखील पाण्याचा एक चांगला स्रोत आहे, त्यात 95 % पाणी असते. ते खाल्ल्याने शरीराला ताजेतवाने वाटते आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. काकडीमध्ये फायबर आणि खनिजे असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात. यासाठी तूम्ही काकडीचे सॅलड बनवून घाऊ शकतात किंवा सँडविचमध्ये काकडीचा समावेश करू शकता. त्याच वेळी काकडीचे डिटॉक्स वॉटर बनवणे आणि पिणे देखील खूप फायदेशीर मानले जाते, परंतु ते शरीराच्या गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे.

लिंबू पाणी
उन्हाळ्यात अनेकांना लिंबू पाणी पिणे आवडते. त्यात शरीरासाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि व्हिटॅमिन सी असते. त्यामूळे लिंबू पाणी प्यायल्याने शरीर थंड होते आणि शरीर हायड्रेट राहण्यास देखील मदत होते. तुम्ही लिंबू पाणी हे मध किंवा मीठ घालून देखील पिऊ शकता. शिवाय ते पचनासाठी देखील फायदेशीर आहे.

पाणीदार फळे
काकडी आणि टरबूज व्यतिरिक्त, इतर अनेक फळे आणि भाज्यांमध्येही पाण्याचे प्रमाण जास्त असते. तुम्ही त्यांचा तुमच्या आहारात अशा काही फळांचा समावेश देखील करू शकता. स्ट्रॉबेरी, खरबूज, अननस, संत्री, पपई, काकडी आणि टोमॅटो यांसारख्या पदार्थांमध्येही पाण्याचे प्रमाण जास्त आढळून येते. तुम्ही त्यांना फळांचा सॅलड म्हणून वेगवेगळ्या प्रकारे समाविष्ट करू शकता. यासोबतच दिवसभरात पुरेसे पाणी प्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button