ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे भीषण अपघात, दोघे जागीच ठार

रत्नागिरी | गोवा महामार्गावरील राजापूर उन्हाळे कुंभारवाडी धबधब्यानजीक गोव्याकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. बाजीराव डोंगळे ( वय ५२, राहणार- हातिवले) व विजय हरेश्वर शिंदे (वय ४५, राहणार-खडपेवाडी, राजापूर) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन तरूणांची नावे आहेत. गुरूवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. या दोन तरूणांच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (two persons lost lives in a tragic accident at rajapur on the mumbai goa highway)

महामार्ग ठेकेदार कंपनीकडून या ठिकाणी संथ गतीने सुरू असलेले काम आणि होणारी दिरंगाई व यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गेले वर्षभर या ठिकाणी वारंवार अपघात होऊन दुर्घटना घडत आहेत. ठेकेदाराच्या आणि प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळेच या दोघांचा हकनाक बळी गेल्याने संताप व्यक्त होतोय. अलीकडे अनेकदा या ठिकाणी अपघात होत आहेत. मात्र संबधीत यंत्रणेकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने अशा अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत

या अपघातानंतर अपघातस्थळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. उपस्थित ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या नावाने शिमगा करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाजीराव डोंगळे व विजय शिंदे हे दुचाकी क्रमांक एम एच ०८ ए.बी.०२७७ वरून हातिवले येथून राजापूरला येत होते. हे दुचाकीस्वार हे कुंभारवाडी येथील जितवणे धबधबा येथे आले असता दुचाकीच्या पुढे असलेल्या कंटेनरल ओव्हरटेक करून पुढे येण्याच्या प्रयत्न करत असताना मागून गोवा दिशेकडून भरधाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी टेम्पोच्या चाकाखाली जाऊन सुमारे १०० ते १२० फूट फरफटत गेली. यामध्ये दुचाकीवरील दोघेही टेम्पोच्या चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच ठार झाले.

दुचाकीला धडक दिल्यानंतर या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या राजापूर-तारळ या एसटी बसलाही या टेम्पोने धडक दिली. सुदैवाने एसटीतील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. मात्र यात एसटीचे नुकसान झाले आहे. सदरचा आयशर टेम्पो सिंधुदुर्गातून खेड येथे जात होता. या अपघाताला कारणीभूत असलेल्या टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या अपघाताची खबर मिळताच पोलिसांसांनी तत्काळ घटनस्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांसह पोलीस कर्मचारी तसेच या परिसरातील अनेक स्थानिक ग्रामस्थ, वाहक चालकांनीही अपघातस्थळी धाव घेतली. तर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, नगरसेवक सौरभ खडपे आदींसह अनेकांनी या अपघातातील या दोन मृत तरूणांना बाहेर काढून खासगी रूग्णवाहिकेद्वारे या दोघांचेही मृतदेह राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. पोलिसांकडून सायंकाळी उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

या अपघातात ठार झालेला विजय उर्फ बंडया शिंदे हा होतकरू तरूण होता. तो हातिवले येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. कामावरून घरी परतत असताना काळाने हा घाला घातला व त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला. चाकीला दिलेल्या धडकेत अपघातामध्ये दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button