आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतून दोन मुले बेपत्ता
पिंपरी l प्रतिनिधी
आळंदी येथील ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली. ही घटना शनिवारी (दि. 25) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने रविवारी (दि. 26) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील ज्ञानदीप वारकरी शिक्षण संस्थेत अनेक मुले वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेत आहेत. शनिवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास 14 वर्षीय दोन मुले बेपत्ता झाली. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला. तसेच मुलांच्या नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र मुले मिळून न आल्याने या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी या दोन मुलांना फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.