breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे तासाभरातच संपली

दुबई – युएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आयसीसीने स्टेडियमच्या 70 टक्के प्रेक्षक क्षमतेला परवानगी दिल्यामुळे आता 24 ऑक्टोबररोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेय स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे अवघी तासाभरातच संपली.

ऑन लाईन तिकिट विक्री सुरू झाली. या सामन्याची तिकिटे विकत घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. या स्टेडियमची क्षमता 25 हजार क्षमतेची आहे. 18 हजार 500 तिकिटे विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. सर्वात महाग तिकिट 2 लाखाचे आहे. आता क्रिकेटप्रेमी ब्लॅकने तिकिटे मिळतील का? अशी विचारणा सोशल मिडियावर करत आहेत. जनरल, जनरल ईस्ट, प्रिमियम, पॅव्हेलियन ईस्ट आणि प्लॅटिनम स्टॅन्डमध्ये बसून प्रेक्षकांना या लढतीचा आनंद घेता येईल.
प्रिमियम तिकिट 30 हजाराला, प्लॅटिनम तिकिट 52,500 ला विकले गेले. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेबर दरम्यात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. 2019मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक शेवटची लढत होती. त्यात भारताने बाजी मारली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button