breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

झोला उचलून निघण्याची वेळ जवळ आली आहे; मोदींवर काँग्रेसच्या महिला नेत्याची टीका

नवी दिल्ली |

उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय बनला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. आता मोदींवर आता झोला घेऊन निघायची वेळ आली आहे, असंही त्या म्हणाल्या. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल असा प्रश्न या चर्चेदरम्यान विचारला असता त्यावर काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी उत्तर दिलं. यावेळी त्या म्हणाल्या, “भारतीय जनता पार्टीची अवस्था अशी झाली आहे कारण मोदीजींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष. भाजपाशासित भागांमध्ये गोंधळ माजला आहे. मोदींना ना करोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोला घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे”.

रागिणी यांनी उत्तरप्रदेशातल्या राजकीय गोंधळावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “योगी आणि मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ ठरु पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटेना. आपल्या ट्विटमध्ये रागिणी म्हणत आहेत की, मोदींना धड देश सांभाळता येतोय ना धड पक्ष.” “भाजपाशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला आहे. उत्तरप्रदेशात सगळे एकमेकांवर वरचढ ठरु पाहत आहेत. करोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोला घेऊन निघण्याची वेळ आलेली आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button