निर्यातीवर बंदी असलेल्या कंपन्यांकडून राज्य सरकार रेमडेसिविर इंजेक्शन घेणार
मुंबई – राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राजेश टोपे म्हणाले, “ज्या कंपन्यांच्या निर्यातीवर केंद्र शासनाने बंदी आणलेली आहे, त्या कंपन्यांनी जर आपल्या राज्य शासनाला निर्यातीसाठी तयार केलेला रेमडेसिवीरचा जो साठा आहे, तो जर दिला तर या पाच-सात दिवसांत देखील निश्चित प्रकारे आपली जी काही कमतरता आहे ती दूर होईल.” ते प्रसार माध्यमांशी आज बोलत असताना ही माहिती दिली.
वाचा :-#Covid-19: सोलापुरात अवघ्या दहा टक्के रुग्णांनाच ‘रेमडेसिविर’
तसेच, “आता राज्यशासन व केंद्र शासनाच्या अनुषंगाने आम्ही हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर जाऊन घेऊ किंवा मुख्यमंत्री देखील या संदर्भात केंद्र शासनाशी बोलणं करून, रेमडेसिवीरचे जे निर्यातदार आहेत, ज्यांच्यावर बंदी आहे. हे निर्यातदार जर त्यांचा माल आपल्याला देऊ शकले किंवा सात कंपन्यांच्या मार्फत देखील देऊ शकले. तरी देखील आपल्या राज्याच्या अतितातडीच्यादृष्टीने वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.” असं देखील टोपेंनी यावेळी बोलून दाखवलं.
“१५ कंपन्यांना निर्यात बंदी केली आहे, त्यांच्याकडे माल तयार आहे. केवळ त्यांच्या निर्यात बंदी केलेला माल आपल्याला मिळू शकेल का? यासाठीचा प्रयत्न केला जात आहे. तो जर कायदेशीरदृष्टीने यशस्वी झाले तर काही अडचण राहणार नाही.” अशी माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.