Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चालकाचं नियंत्रण सुटलं, मजुरांना नेणारा पिकअप रस्त्याच्या कडेला उलटला; ४३ जण जखमी

  • शेतमजुरांना घेऊन जाणाऱ्या पिखअपता अपघात
  • ४३ शेतमजूर जखमी, सुदैवाने जिवीतहानी नाही
  • चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील घटना
चंद्रपूर : शेतमजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन अपघात झाला आहे. या अपघातात ४३ मजूर जखमी झाले आहेत. ही घटना चिमूर तालुक्यातील गोदेंडा-खांबाळा मार्गावर आज घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आलं आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना गती आली आहे. मजूरांची कमतरता असल्यानं पिकअप, किंवा रिक्षाने मजुरांना शेतात घेऊन जात आहेत.

चिमूर तालुक्यातील येरखडा येथील पिकअप वाहनाने केवाडा गावातील शेतमजुरांना गोंदेडा -खांबाळा मार्गावरील मनोज वाघे यांच्या शेताकडे घेऊन जात असाताना पिकअप वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन वाहन उलटले. या वाहनात ४३ मजूर होते. अपघात होताच आसपासचे शेतकरी, शेतमजुर धावून गेले व वाहनाखाली दाबल्या गेलेल्या जखमींना त्यांनी बाहेर काढलं. जखमींना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे घेऊन जाण्यात आले आहे. या अपघातात १९ शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर २४ शेतमजूर किरकोळ जखमी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button