Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

ठाकरे सरकार कोसळले; दिव्यापाठोपाठ कळव्यात शिंदे समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन…

ठाणे : एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील आणि ठाण्याबाहेरचे अनेक पदाधिकारी पाठींबा दर्शवत आहेत. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

पावसात भिजून देखील सगळे शिंदे समर्थक कळव्यातील या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, नगरसेवक यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी धन्यवाद व्यक्त करत आपल्या भाषणाला सुरवात केली. शिवसेनेची संघटना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील घराघरात कशा प्रकारे पोहचवली याची जाणीव या भाषणादरम्यान श्रीकांत शिंदे यांनी या भाषणादरम्यान शिंदे समर्थकांना करून दिली. एकनाथ शिंदे हे गेल्या कित्तेक वर्षांपासून निस्वार्थपणे सर्वांच्या सुखःदुःखात सहभागी झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. भावाचा भावावर आणि मुलाचा बापावर विश्वास नसताना ५० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत विश्वासाने गेले आहे. इतक्या आमदारांचा विश्वास आणि पाठींबा शिंदेबरोबर आहेत. त्याचे कारण म्हणजे शिंदे यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पायाला भिंगरी लावून काम केले असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

संघटना वाढवत असताना एकनाथ शिंदे हे फक्त ठाण्यासाठी मर्यादित न राहता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोहचली. महालक्ष्मी एक्प्रेस बंद पडली, राज्यात महादुर्घटना आल्या, कोल्हापूरला पूर आला, केरळला पूर आला अशा राज्यातील आणि देशातील विविध आपत्तीच्या वेळी सगळ्यात पहिले धाऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ शिंदे यांनी हे सगळे काम शिवसेना वाढावी म्हणून केले. गडचिरोलीचा विकास झाला पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचे पालकत्व मागून घेतले. गडचिरोलीमध्ये पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांना आणि कुटुंबाला धमक्या आल्या. मात्र तरीही एकनाथ शिंदे यांनी कुठेही न डगमगता माघार घेतली नाही. केरळ, कोल्हापूर, महाड, चिपळूण या ठिकाणी आपत्ती दरम्यान एकनाथ शिंदे सगळ्यात पहिले निवडणूक लढायची आहे म्हणून नाही, तर फक्त शिवसेना वाढावी म्हणून काम केले असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

शिवसेनेसाठी एवढं काम केल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्यासाठी जी भाषा वापरली जाते ती योग्य नाही. जो साधा एक नगरसेवक किंवा आमदार निवडून आणू शकत नाही तो एकनाथ शिंदे, त्यांचे कुटुंब आणि महिलांच्या विरोधात टीका करत असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे हा नेता किंवा कार्यकर्ता एका दिवसात तयार झालेला नाही. शिंदे यांनी संघटनेसाठी ४० वर्ष दिली आणि या ४० वर्षांत घराघरात शिवसेना पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी करून संघटना वाढवण्याचे काम असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. एकीकडे संघटना वाढवत असताना सहकारी पक्ष हा आपला पक्ष वाढू देत नसेल, शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, पक्षाची कुचंबना करत असेल, तर आपण या पक्षासोबत का रहावं, असा सवाल देखील श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

एकवेळ पक्षप्रमुख सगळ्यांना सोडू शकतात. मात्र एका माणसाला सोडू शकत नाही, असा अप्रत्यक्ष टोला श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला. या भाषणादरम्यान समर्थकांकडून संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजीला करण्यात आली. त्यावेळी समर्थकांनी ‘निम का पत्ता कडवा है’ अशी घोषणाबाजी सुरू केली असता श्रीकांत शिंदे यांना हटकले आणि कोणाबद्दल अपशब्द काढू नका ती त्यांची संस्कृती आहे. ती आपली संस्कृती नसल्याचे श्रीकांत शिंदे बोलले. आज ही जनता हे सगळं उभ्या डोळ्याने बघतेय आणि याचं उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही, असे मत देखील श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संघटनेला परिवार मानलं म्हणून परिवारापेक्षा जास्त वेळ एकनाथ शिंदे यांनी संघटनेला दिला. म्हणून राज्यातील तमाम बांधवांचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. शिंदे यांच्या समर्थनार्थ एवढे लोक जमा होत असल्याचे सांगत सगळ्यांचे श्रीकांत शिंदे यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button