breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील वाढते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा : पार्थ पवार

  • पिंपरी-चिंचवड पोलीस, महापालिका प्रशासनाकडे केली मागणी
  • पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या ९ महिन्यांत २१० बळी;३०० हून अधिक गंभीर

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ९ महिन्यांमध्ये विविध अपघातांमध्ये तब्बल २१० नागरिकांचा बळी गेला आहे. सुमारे ३०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने वाढते आपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यक आहे. याकडे पार्थ पवार यांनी लक्ष वेधले आहे.

फुगेवाडी येथे झालेल्या अपघातात ६ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि महापालिका प्रशासनाने ‘‘अपघातांना जबाबदार कोण यापेक्षा ते रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

सत्ताधारी भाजपाने शहराचा कारभार बिघडला…

स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक विकासकामे अर्धवट असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने सुनियोजित पिंपरी-चिंचवड शहराचा कारभार बिघडून सुरू केलेली कामे अपूर्ण राहिली आहेत, अशी टीका करीत ‘‘हिच का स्मार्ट सिटी’’ असा सवालही युवा नेते पार्थ पवार यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button