breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

राज ठाकरेंना समर्थन, पण मला हनुमान चालीसा येत नाही – कालीचरण महाराज

सोलापूर |

इंदूरच्या धर्मसभेत महात्मा गांधींच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या कालीचरण महाराजांचं हिंदुत्व आज कॅमेऱ्यासमोर उघडं पडलंय. कारण, महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयी घेतलेल्या भूमिकेचं जोरदार समर्थन करणाऱ्या महाराज कालीचरण यांनाचं हनुमान चालीसा येत नाही, याची कबुली खुद्द कालीचरण यांनी कॅमेऱ्यासमोर दिलीये.

सोलापूरच्या दौऱ्यावर असलेल्या कालीचरण महाराज यांनी शहरातील विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांना पत्रकारांनी भोंगे लावण्यावरून महाराष्ट्रात जे वातावरणात तयार झालं आहे, त्याकडे आपण कसे पाहता असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी राज्यात जी भूमिका घेतली. त्यांच्यासोबत आम्ही आहोत. जसं योगी आदित्यनाथांनी केलं ते संपूर्ण देशभर व्हायला हवं असं म्हणत राज यांची ही भूमिका म्हणजे मर्दोवाली बात असल्याचं, कालीचरण महाराजांनी म्हंटलं.

जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा, असं वक्तव्यही केलं. तेव्हा देशात वाढत्या महागाईकडे त्यांचं लक्ष्य वेधलं असता, महागाई वाढली म्हणून काय झालं? लोकांची आर्थिक स्थिती सुधारलीये, असा दावा त्यांनी केला आणि पुढे पुन्हा हिंदु पुराण सुरू ठेवेल, असं म्हटलं. तेव्हा मटा प्रतिनिधीने त्यांना हनुमान चालीसा म्हणणार का? असा प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले की, आपल्याला हनुमान चालीसा येत नसल्याची कबुली दिली. त्यामुळे उपस्थित सर्वच अवाक झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button