ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संप थांबवून कामावर या;असे आवाहन महामंडळाचे नाशिक विभाग नियंत्रक मुकुंद कुंवर यांनी केले

  नाशिक | सुमारे पाच महिन्यांपासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निलंबनापासून बडतर्फी अन सेवा समाप्तीपर्यंत विविध कठोर कारवाई केली आहे. अशा जिल्ह्यातील १ हजार ५५ कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल, असे आवाहन महामंडळाचे नाशिक विभाग नियंत्रक मुकुंद कुंवर यांनी केले आहे. सेवासमाप्तीची कारवाईही रद्द करून कामगारांना १ एप्रिलपासून पुनर्नियुक्ती देण्यात येईल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे, त्यांना अन्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आर्थिक लाभ मिळावेत, यासाठी दिवाळीपासून राज्यभरातील कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गाला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारने दरमहा पाच हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ देण्याची तयारी दर्शविली. परंतु, तरीही बहुतांश कर्मचारी कामावर रूजू झालेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फीसारख्या कारवाया करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ५४८ कर्मचारी सध्या बडतर्फ असून, ४६८ जण निलंबित आहेत. याशिवाय ३९ जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत हे कर्मचारी कामावर रूजू झाले, तर त्यांच्यावरील सर्व कारवाया मागे घेतल्या जातील, अशी ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनात दिली. नाशिक विभागाला त्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर विभाग नियंत्रक मुकुंद कुवर यांनी जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना आवाहन करणारे पत्र काढले आहे. संपावरील कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे, त्यांच्यावरील सर्व कारवाया मागे घेऊ असे आवाहन त्याद्वारे करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button