मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर धोनीचं मोठं वक्तव्य
2025 च्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मुंबई इंडियन्सने विजयाची हॅटट्रिक

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मुंबई इंडियन्सने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, मुंबई इंडियन्सचा संघ हा 8 सामन्यांत 4 विजय आणि 4 पराभवांसह पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ एवढ्याच मॅचेस खेळला सला तरी फक्त 2 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये अगदी तळाशी आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा हा चेन्नईविरुद्धच्या विजयाचा नायक होता, ज्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली. मात्र या ,सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने असे काही धक्कादायक वक्तव्य केलं, जे ऐकून सर्वच हबकले.
हेही वाचा – ‘बहिणाबाईंच्या कविता आजही समर्पक’; शंकर जगताप
पुढच्या सीझनमध्ये करू दमदार पुनरागमन
सामन्यानंतर, सीएसकेचा कर्णधार असलेला धोनी म्हणाला की, आमच्या संघाची कामगिरी खूपच सरासरी होती. मला माहित होते की सामन्याच्या दुसऱ्या भागात काही प्रमाणात दव पडेल, असेही तो म्हणाला.. जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम डेथ बॉलरपैकी एक आहे आणि मुंबई इंडियन्सने त्यांची डेथ बॉलिंग लवकर सुरू केली, ज्यामुळे आम्हाला जास्त धावा करता आल्या नाहीत, असे धोनीने नमूद केलं.आयुष म्हात्रेने चांगली फलंदाजी केली आणि त्याचे शॉट्सही चांगले निवडले. आम्हाला माहित होते की या खेळपट्टीवर धावा करणे सोपे होणार नाही. जर तुम्ही सुरुवातीच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्या तर ते कठीण होते, असे धोनी म्हणाला.
आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की आपण केवळ चांगले क्रिकेट खेळल्यामुळेच यशस्वी होतो. त्यामुळे आपण जास्त भावनिक होता कामा नये. एका वेळेस आपण एकाच मॅचवर लक्ष दिलं पाहिजे आणि जर प्लेऑफमध्ये जागा मिळाली नाही तर पुढल्या सीझनच्या रणनितीचा विचार करावा लागेल. पुढल्या सीझनबद्दल सूतोवाच करून धोनीने अप्रत्यक्षरित्या संकेत दिले की तो आयपीएल 2026 च्या सीझनमध्ये खेळू शकतो.
फलंदाजांची काढली खरडपट्टी
आम्ही सरासरी धावसंख्येपेक्षा थोडे कमी धावा केल्या. मुंबईने त्यांची डेथ बॉलिंग लवकर सुरू केली, असे सामन्यानंतर धोनीने सांगितलं. आम्हीही लवकर स्लॉग शॉट्स खेळायला हवे होते, त्यांनी फिरकी गोलंदाजी चांगली खेळली आणि आम्ही कधीही मोठी, लढण्यालायक स्कोअर केला नाही. तुम्ही पहिल्या सहा षटकांत जास्त धावा दिल्या तर याचा अर्थ असा नाही की चेंडू बॅटवर व्यवस्थित येत आहे, असे तो म्हणालाय आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या या पराभवामुळे सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.