नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना गती
- तीन दिवसांत मुंबईसह राज्यात मुसळधार
पुणे |
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा यंदा अंदमान ते महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास वेगाने झाला. मात्र, मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होताच त्यांचा वेग मंदावला होता. पुणे, अलिबागसह राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्य़ांत वेळेआधीच दाखल झालेला मोसमी पाऊस दोन दिवसांपासून स्थिर होता. मात्र, बंगालच्या उपसागरात दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मोसमी वाऱ्यांना पुन्हा चालना मिळणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत मोसमी पाऊस मुंबईसह उर्वरित राज्यात प्रगती करेल, अशी शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त के ली आहे.
अंदमान बेटांसह के रळातील आगमन लांबल्याने मोसमी पाऊस यंदा ३ जून रोजी दक्षिण के रळात दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रावरून वेगाने वाटचाल करत दोनच दिवसांत मोसमी पावसाने महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मोसमी पाऊस पुण्यात दाखल झाला, तर मुंबईतही पावसाने हजेरी लावली. मात्र, अद्याप तेथे मोसमी पाऊस दाखल झाला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट के ले आहे. गेल्या रविवारी अलिबाग, पुण्यासह मराठवाडय़ातील काही भागांत मोसमी पाऊस दाखल झाला.