धक्कादायक! १५ वर्षांपासून बंद असणाऱ्या गाळ्यात केमिकलमध्ये आढळले मानवी अवयव
नाशिक |
नाशिकमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या शेजारील भागात असलेल्या अपार्टमेंटमधील बंद गाळ्यात मानवी हाडे सापडली आहेत. या प्रकारामुळं पसिरात एकच गोंधळ उडाला आहे. हा गाळा जवळपास पंधरा वर्ष बंद असल्याचा दावा मालकाने केला आहे. त्यामुळं हे नेमकं काय प्रकरण आहे याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. भरवस्तीत केमिकलमध्ये ठेवलेली मानवी हाडे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहेत. वैद्यकिय शिक्षणासाठी मानवी अवयवांचे संकलन केले जाते. त्याच पद्धतीने हे अवयक संकलन करुन ठेवले होते. त्यामुळं हा घातपात आहे की शिक्षणासाठी संकलित केलेले अवयव आहेत. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
एका अपार्टमेंटच्या बंद गाळ्यात मानवी हाडे सापडली आहेत. वेगवेगळ्या कॅनमध्ये केमिकल प्रक्रिया करुन मानवी डोके, हात, कान, असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी गाळा मालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून आपण गाळा उघडलाच नसल्याचे मालकाने सांगितलं आहे. तसंच, पंधरा वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी या गाळ्यात स्थायिक होते, असंही त्याने म्हटलं आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.