breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“राऊत सकाळी काय बोलता हे संध्याकाळी तुमच्या लक्षात राहत नाही”; शिंदे गटातील नेत्याची टीका

महावक्ता संजय राऊत जी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे!

मुंबई : शिंदे गटातील आमदारांना दुंडक्याने बडवून काढा, असं वक्तव्य शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी अलिभागच्या सभेत केलं होतं, असं खासदार संजय राऊत म्हणाले. या टिकेला आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शीतल म्हात्रेंनी एक व्हिडीओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज सकाळीच महाज्ञानी, महावक्ता संजय राऊत यांच्या मुखाने त्यांनी आज सकाळी एक आकाशवाणी केली. ती आकाशवाणी झाल्यानंतर मला असं कळलं की मी जी गेली १८ वर्षे शिवसेनेत कट्टर शिवसैनिक म्हणून काम करत होते. तिला आज एक मोठी नेता बनविण्यात आले आहे. त्यांनी असं सांगितलंय की माझ्या वक्तव्यामुळे ४० आमदार गुवाहाटीला निघून गेले, असं म्हटलं आहे.

संजय राऊतजी हसावं की रडावं मला कळत नाहीये. मी आमदार आहे की, खासदार आहे, मी माजी नगरसेविका आहे. माझ्या बोलण्याला घाबरून हे सगळे जन पळून गेले हे खरोखर एखाद्या लहान मुलाला सुद्धा पटणारं नाहीये. राऊत साहेब थोडसं मानसिक संतुलन तुमचं बिघडलेलं वाटतंय. कारण तुम्ही सकाळी काय बोलता हे संध्याकाळी तुमच्या लक्षात राहत नाही. माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की चांगले उपचार घेणं फार गरजेचं आहे. लवकर बरे व्हा..गेट वेल सून, अशी खोचक टीका शीतल म्हात्रेंनी खासदार संजय राऊतांवर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button