breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे – राजेश टोपे

मुंबई | प्रतिनिधी 
राज्यात येथून पुढे कोरोना नियमांच्या अनुशंगाने नागरिकांसाठी सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूवर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.  राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याच्या सरकार विचारात नाही

– लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार

– राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता

– शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता

– दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता

– राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध

– आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी

– मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button