breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करणार- सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई |

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घरवापसीबाबत पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. हिंदू धर्मातून गेलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले जाईल, असं हिंदू एकता महाकुंभला संबोधित करताना भागवत म्हणाले. यासोबतच मोहन भागवत यांनी हिंदू एकता महाकुंभात सहभागी झालेल्या लोकांना घरवापसी करण्याची शपथ दिली आहे. मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. संघप्रमुखांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना हिंदू धर्माशिवाय इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करू नये, याची शपथही दिली. तसेच त्यांनी इथे जमलेल्या लोकांना प्रत्येक स्त्रीचा आदर करण्याची शपथ घेण्यास सांगितले.

भागवत यांनी हिंदूंमध्ये एकतेची गरज असल्याचं म्हटलं. तसेच बहुसंख्य समाजातील लोकांना जातीयवाद आणि इतर सामाजिक वाईट गोष्टींपासून दूर राहण्यास सांगितले. शपथ देताना ते म्हणाले- “मी हिंदू संस्कृतीचा धर्मयोद्धा, प्रभू श्री रामांच्या संकल्पस्थळी, सर्वशक्तिमान देवाला साक्षी ठेवून, मी माझ्या पवित्र हिंदू धर्माचे, संस्कृती आणि हिंदू समाजाचे आयुष्यभर संरक्षण, संवर्धन आणि संरक्षण करण्याची शपथ घेतो. मी प्रतिज्ञा करतो की मी कोणत्याही हिंदू बांधवाला हिंदु धर्मापासून विचलित होऊ देणार नाही.”

 मोहन भागवत यांनी धर्मांतर आणि घरवापसीबाबत वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी घरवापसीबाबत अनेकदा वक्तव्ये केली आहेत. बुधवारपासून चित्रकूटमध्ये हिंदू एकता महाकुंभाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. या महाकुंभात मोहन भागवत प्रमुख पाहुणे आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हिंदूंना एकत्र एका छताखाली आणणे हे हिंदू एकता महाकुंभ या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाला कवी कुमार विश्वास, भाजपा खासदार मनोज तिवारी, बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणा, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि इतर अनेक जण उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button