breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

संजय राऊत म्हणतात, “विरोधकांनी एकत्र येण्याची गरज; राहुल गांधीची घेणार भेट”

मुंबई |

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे थोड्याच वेळात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. राऊत यांनी आज (५ ऑक्टोबर) स्वतः ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “लखीमपूर खेरी येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराचाच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. त्यातच, उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधींना अटक केली आहे. अशावेळी एकजुटीने काम करण्याची आवश्यकता असून मी आज याबाबत राहुल गांधी यांची भेट घेईन”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. संध्याकाळी ४.१५ वाजता राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यातील या भेटीकडे निश्चितच लक्ष राहणार आहे. लखीमपूर हिंसाचार प्रकरणाने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघत आहे.

“लखीमपूर खेरीमधील दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांनाही अटक केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखलं जात आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेशातील सरकारच्या दडपशाहीविरोधात विरोधकांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. मी दुपारी ४.१५ वाजता राहुल गांधी यांची भेट घेईन. जय हिंद”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, लखीमपूर घटनेनंतर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधींना पोलिसांनी सोमवारी (४ ऑक्टोबर) ताब्यात घेऊन सीतापूरमधील विश्रामगृहात ठेवलं होतं. पण आता त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले त्या विश्रामगृहातच तात्पुरतं जेल उभारण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button