महाराष्ट्र

RTI कायद्यात बदल केल्यास आंदोलन: अण्णा हजारे

नगर: ‘केंद्र सरकारने माहितीचा अधिकार कायद्यात ज्या दुरुस्त्या करण्याचे ठरविले आहे, त्या चुकीच्या असून त्यामुळे हा कायदा निष्पभ्र होईल. अर्जदाराच्या मृत्यूनंतर अर्जच रद्द होण्याची दुरूस्ती तर आरटीआय कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका वाढविणारी आहे. त्यामुळे या कायद्यात बदल केले जाऊ नयेत, अन्यथा पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन केले जाईल,’ असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
माहितीचा आधिकार कायद्यात केंद्र सरकारकडून काही दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रस्तावावर लोकांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. या संदर्भात अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित मंत्रालयाला पत्र लिहले आहे. ‘भष्टाचार कमी व्हावा यासाठी हा कायदा करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला होता. त्यासाठी राज्यात अनेक आंदोलने केली. त्यामुळे हा कायदा झाला असून नंतर त्याला देशव्यापी स्वरूप मिळाले. मधल्या काळात या कायद्याचे चांगले परिणाम दिसून आले. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. सामान्य नागरिकांची ताकद यामुळे वाढली आहे. मात्र, यासंबंधी काही तक्रारी आल्याचे सांगत या कायद्यात बदल करण्याचा जो घाट घातला आहे,’ तो चुकीचा आहे, असे हजारे यांनी म्हटले पत्रात म्हटले आहे.
या कायद्यात सुचविण्यात आलेल्या काही दुरूस्त्या अन्यायकारक असल्याने त्या कदापी स्वीकारल्या जाणार नाहीत. नव्या प्रस्तावानुसार अर्जदाराला आयोगाकडे केलेले आपील मागे घेण्याची आणि त्यानंतर पुन्हा आपील करता न येण्याची दुरूस्ती आहे. ती चुकीची ठरेले. कारण माहितीचा आधिकार वापरणाऱ्या नागरिकांवर आधीच दबाव आणला जातो. या तरतुदीचा फायदा घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणून आपील मागे घेण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार जर माहिती मागविणाऱ्या अर्जदाराचा मृत्यू झाला, तर त्याने मागविलेली माहिती त्याच्या पश्चात वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे. आता दुरूस्तीनुसार अर्जदाराचा मृत्यू झाला तर त्याचा अर्ज रद्द होणार आहे. ही दुरूस्ती सर्वांत घातक आहे. कारण सध्या आरटीआय कार्यकत्यांच्या हत्या होत आहेत, गेल्या एका वर्षात ५६ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. तर १३० कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. त्यांना पुरेसे संरक्षण मिळणे दूरन नव्या दुरूस्तीमुळे त्यांच्या जीवाचा धोका आणखी वाढू शकतो हे यावरून लक्षात येते, असे अण्णांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button