कोकण-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटांसह पाऊस
मुंबई – हवामान विभागाने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवल्याने गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापणीला आलेल्या गहू पिकाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच हवामान बदल होणार असल्याने संसर्गजन्य आजार डोके वर काढू शकतात. त्यामुळे हवामान विभागाने आज दिवसभरात शेतकऱ्यांना आणि इतरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
वाचा :-दिल्लीत अचानक जोरदार पाऊस
Thunderstorm 🌩🌩accompanied with lightning likely to occur at isolated places in the districts of Ratnagiri, Sindhudurg, Satara, Sangli, Solapur and Kolhapur today on 12 Mar, 2021.
-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 12, 2021
दरम्यान, राजधानी नवी दिल्लीत आज सकाळी वातावरणात अचानक बदल झाला. दिल्लीत पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दिल्लीतील कनॉट परिसरात, नोएडा आणि इतर ठिकाणी पाऊस झाला आहे. तसेच दिल्लीत आज दिवसभर पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये वातावरण बदललं असून दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.