breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

..तर पुढचा मुख्यमंत्री मीच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान

पुणे | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे पुण्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्घव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वादावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच, असं सूचक विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.

पत्रकारांनी रामदास आठवले यांना यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच असेन असं म्हटलं. यानंतर एकच हास्यकल्लोळ झाला. तसेच, दोन्ही नेत्यांनी मनातून चीड काढून टाकावी. दोघांचे चांगले संबंध होते, पुन्हा त्यांची मैत्री व्हावी असं मला वाटत आहे असं आवाहनही केलं.

हेही वाचा     –        ‘मेरी हिम्मत परखने की गुस्ताखी मत करना’; देवेंद्र फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला घाम फोडला. आता विधानसभा निवडणुकीत उरलीसुरली गुर्मी उतरवणार आहोत. राजकारणात एक तर तू राहशील, नाही तर मी राहीन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button