Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

ऑपरेशन सिंदूर। पाकिस्तानात बहुसंख्य भागात आणीबाणी, पाक सरकार, लष्कर आणि दहशतवाद्यांची घाबरगुंडी!

भारताची मोठी तयारी सुरू, सैनिकांच्या सुट्ट्या रद्द, माजी सैनिकांनाही पाचारण, १८ विमानतळांवरील उड्डाणे रद्द !

नवी दिल्ली / श्रीनगर / इस्लामाबाद : भारताच्या लष्कराने हाती घेतलेले आणि यशस्वीपणे पार पाडलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ ही फक्त दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी केलेल्या कारवाईचा ‘ट्रेलर’ होता, अजून मुख्य ‘पिक्चर’ जगाला पाहायचा आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी अशा प्रकारचे ट्विट करून लष्कराच्या व्यूहरचनेला पुष्टीच दिली आहे.

लाहोर तसेच पंजाबात आणीबाणी..

‘ऑपरेशन सिंदूर’ घाबरगुंडी उडालेले पाकिस्तानचे सरकार त्यांचे लष्कर आणि दहशतवादी यांना काय करावे ते सुचेनासे झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानात बहुसंख्य भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी आणीबाणीची घोषणा केली आहे. भारताच्या कारवाईमध्ये पंजाब प्रांताच्या चार प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले झाले आहेत. त्यामध्ये बहावलपूर, मुरीदके, सियालकोट आणि चक अमरू या शहरांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख करून टाकण्यात आले आहेत.

भारताचे गनिमी काव्याचे तंत्र..

पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट असताना भारताने मात्र शिवरायांच्या गनिमी काव्याचे तंत्र अवलंबिले आहे. पाकिस्तान वरील कारवाईचा मोठा भाग अजून बाकी असल्यामुळे भारताची मोठी तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत तर माजी सैनिकांनाही तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बलुचिस्तान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिवाळी..

भारताने अचानक केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे आधीच पाकिस्तानला विरोध करणाऱ्या बलुचिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये मात्र नागरिकांनी दिवाळी साजरी केली. अनेक ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले असून मिरवणुकाही काढण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या जोखडातून लवकरात लवकर आमची सुटका करावी अशी घेतली नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.

भारताची मोठ्या कारवाईची तयारी सुरू..

दिल्ली विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथून दररोज सुमारे १३०० विमानांची ये-जा असते. त्याचप्रमाणे, श्रीनगर, जम्मू, लेह, चंडीगड, बिकानेर, जोधपूर, राजकोट, धर्मशाला, अमृतसर, भूज आणि जामनगरमधील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

सीमेलगतच्या शाळांना सुट्टी..

जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील काही जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये कडकडीत बंदही पाळण्यात आला असून व्यवहार ठप्प ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याच्या शक्यतेमुळे सर्वत्र सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सीमेवर तणाव मोदींचे दौरे रद्द..

पाकमध्ये भारताने कारवाई केल्यामुळे सीमेवर तणाव वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड या तीन देशांचा दौरा रद्द केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेला असावा, असे मानले जात आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी ‘अभी तो पिक्चर बाकी है I’ असे ट्वीट केल्यामुळे याबाबतचा ‘सस्पेन्स’ आणखी वाढला आहे.

गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय..

गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. माजी सैनिकांनाही तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऑपरेशन सिंदूर का ठरलले खास?

‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानला मोठा संदेश दिला आहे. हे ऑपरेशन अनेक अर्थाने खास होते. पहिले म्हणजे, हा एक अचूक हल्ला होता. यात फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य केले गेले. दुसरे म्हणजे, हा एक यशस्वी हल्ला होता. यात दहशतवाद्यांची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. तिसरे म्हणजे, हा एक निर्णायक हल्ला होता. याने पाकिस्तानला हा संदेश दिला की, भारत आपल्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारताच्या लष्करी ताकतीचे आणि क्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. भारताकडे जगातील सर्वात आधुनिक सेना आहे, हे यातून दिसून येते. या ऑपरेशनने भारताला एक मजबूत आणि जबाबदार देश म्हणून ओळख दिली आहे.

लष्करी सामर्थ्याची क्षमता आणि वकूब

या हल्ल्यात भारतीय सेना, नौसेना आणि वायुसेनेच्या अचूक हल्ला करणाऱ्या शस्त्रप्रणालीचा वापर केला गेला. यामध्ये लोइटरिंग शस्त्रांचा देखील समावेश होता. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी कॅम्पवर हल्ला करण्यासाठी ठिकाणे गुप्तचर संस्थांनी दिली होती. हे हल्ले भारतीय भूमीवरूनच केले गेले. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले. पण, त्यांचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

मसूद अजहरच्या कुटुंबातील चौदा जणांचा खात्मा..

पाकिस्तानातील सर्वात कुख्यात दहशतवादी, संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ जण मारले गेले आहेत. तसेच, मसूद अजहरचा भाऊ रऊफ असगर गंभीर जखमी आहे. मारल्या गेलेल्यां मध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वांटेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा देखील आहे. जैश-ए-महम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरने सांगितले आहे की, भारताने बहावलपूरमधील जामिया मस्जिद सुभान अल्लाहवर केलेल्या हल्ल्यात त्याचे दहा कुटुंबीय आणि चार साथीदार मारले गेले. हा मसूद अजहर तोच आहे, ज्याला १९९९ मध्ये ‘आय सी ८१४’ विमानाचे अपहरण झाल्यानंतर भारताच्या तुरुंगातून सोडण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button