देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात कायः अमोल मिटकरी
घरात बायको इज्जत देत नाय आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागलेत
![Nagpur, MNS, distorted, act, case, front,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/mumbai-780x470.jpg)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर जहरी शब्दात टीका केली. “मनसे पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा आहे. नागपुरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या विकृत कृत्याच प्रकरण समोर आलय, लवकरच तुम्हाला ते समजेल” असं अमोल मिटकरी म्हणाले. ‘शेवटी मनसे हा सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा पक्ष आहे’ अशी टीका मिटकरींनी केली. शरद पवार कोर्टात केस जिंकले, तर अजितदादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल असं योगेश चिले म्हणालेत, त्यावर मिटकरी म्हणाले की, “चिले, पिले, ही बांडगुळ नवीनच ऐकतोय. त्यांची औकात काय? देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? घरात बायको इज्जत देत नाय आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागलेत”
अजितदादांना आता माननीय बोलतोय, उद्या राज ठाकरेंवर टीका झाली, तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कपडे फाडू असा इशारा चिलेंनी दिलाय. त्यावरही अमोल मिटकरींनी उत्तर दिलं. “अरे, चिल्या तुझे दुधाचे ओठ सुकलेले नसतील. अजितदादांवर टीका केलीना बेट्या तुझ्या राज ठाकरेने तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत, लक्षात ठेव” असं अमोल मिटकरी म्हणाले.
‘स्वत:च्या बापाच खून करण्याचीही त्यांची तयारी’
जय मालोकरचा मृत्यू दबावातून झालाय, असं तुम्ही म्हणता, त्यावर मिटकरी म्हणाले की, “जयच्या मृत्यूला मनसेचे पदाधिकारी जबाबदार आहेत. तो मुलगा तिथून कसा गेला, त्याच्या छातीला मार लागलेला का?. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर येईलच. या सगळ्या गुंडांची चौकशी झाली पाहिजे” “माझ्या माहितीनुसार जय मालोकर 10 दिवसानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता. त्याचा खुन्नस मनसेला होता. ते खुनशी लोक आहेत. रमेश किणीच्या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. त्यांना वाटलं आपण मोकाट झालो. कोणाचाही जीव घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स वाढला. स्वत:च्या बापाच खून करण्याचीही त्यांची तयारी आहे” अशा शब्दात मनसेवर तोंडसुख घेतलं.