जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू
नागपूर येथील रूपचंदानी यांच्या कुटुंबाकडून तिलक रूपचंदानी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातल्या 6 नागरिकांचा समावेश आहे. तर 8 जण जखमी आहेत. या घटनेत नागपूरचं तिलक रूपचंदानी कुटुंब देखील आहे. 16 एप्रिल रोजी तिलक रूपचंदानी आपल्या परिवारासह जम्मू – काश्मीरला फिरायला गेले होते. 27 तारखेला नागपूरला परतणार होते. मात्र त्याठिकाणी त्यांच्या पत्नी या हल्ल्यात जखमी झाल्या असल्याचं वृत्त आहे.
हेही वाचा – PCMC: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या संकेतस्थळाचे लोकार्पण
नागपूर येथील रूपचंदानी यांच्या कुटुंबाकडून तिलक रूपचंदानी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने परिवार चिंतेत असल्याचं रूपचंदानी परिवाराने सांगितले. तिलक रूपचंदानी यांचे भाऊ यावेळी म्हणाले की, आम्हाला घटनेची माहिती बातम्यांमधूनच कळाली. त्यानंतर आम्ही आमच्या भावाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. तिलक रूपचंदानी यांच्या पत्नी या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत असंही आम्हाला बातम्यांमधूनच समजलं. माझा भाऊ आणि त्याचा परिवार घरी सुखरूप यावे एवढीच आमची आता इच्छा आहे, असं यावेळी तिलक रूपचंदानी यांच्या भावाने सांगितल.