breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

#PCMC Politics: राज्यात काहीभाग सील करणार; संचारबंदीचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचा शासनाचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, संचारबंदी आदेश जारी आहे. त्यामुळे आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकले जाईल. कोरोनासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.                        

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील जनतेला दिल्या शुभेच्छा. संपूर्ण जग #coronavirus च्या संकटाचा मुकाबला करत असताना जागतिक आरोग्याचं आणि आरोग्य संघटनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

‘आरोग्यम् धनसंपदा’ मानणारी आपली संस्कृती. परंतु, जागतिकीकरणाच्या काळात आधुनिक जीवनपद्धतीत वैयक्तिक आरोग्याच्या बरोबरीने सार्वजनिक, जागतिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे. भविष्यात वैयक्तिक आरोग्यासह सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणसाठी सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.

#coronavirus चे संकट पाहता उद्या हनुमान जयंती आणि शब्ब-ए-बारातसाठी नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन आहे. मुस्लिम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करण्याचे केले आवाहनही पवार यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button