भारतात फक्त जय श्री राम..पठाण चित्रपटावरून कंगनाची प्रतिक्रिया
पठाण चित्रपटाचे कथानकानुसार योग्य नाव ‘भारतीय पठाण’ असालया हवे
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा पठाण हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सध्या पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या याशाव अभिनेत्री कंगना रणैतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने आपल्या ट्विटवर लांब नोट लिहत काही लोकांना सुनावले आहे.
पठाण चित्रपट द्वेषावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणाऱ्या सर्वांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर प्रेमाचा विजय झाला? चला मुद्द्यावर येऊया…तिकीट खरेदी करून कोण चित्रपट यशस्वी करत आहे? हे भारताचे प्रेम आहे, जिथे 80% हिंदू राहतात आणि इथे पठाण नावाचा चित्रपट बनवला जातो, ज्यात आपला शत्रू देश पाकिस्तान आणि ISIS दाखवला गेला आणि तो चित्रपट यशस्वीही झाला. ही आपल्या भारताची भावना आहे. हे आपल्या भारतीयांचे प्रेम आहे, जे द्वेषावर आणि घाणेरड्या राजकारणाच्याही पुढे आहे. पण ज्यांना मोठ्या आशा आहेत, त्यांना मी सांगू इच्छिते की पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो, पण भारतात फक्त जय श्री राम, जय श्री राम हा नाराच राहणार.., असं कंगनाने म्हटलं आहे.
माझा विश्वास आहे की भारतीय मुस्लीम देशभक्त आहेत आणि अफगाण पठाणांपेक्षा खूप वेगळे आहेत. मुख्य म्हणजे भारत कधीच अफगाणिस्तान होणार नाही. अफगाणिस्तानमध्ये काय चालले आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. तिथे नरकापेक्षा वाईट परिस्थिती आहे. म्हणून पठाण चित्रपटाचे कथानकानुसार योग्य नाव भारतीय पठाण असालया हवे, असंही कंगनाने म्हटलं आहे.