राज्यातील कोरोना परतीच्या वाटेवर; शनिवारी दिवसभरात ९७ नवे रुग्ण
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने मंदावली आहे. कोरोना परतीच्या वाटेवर दिसत असून काल शनिवारी केवळ ९७ रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही दीड हजारच्या आसपास असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने थैमान घातले असताना राज्यात तिसरी लाट अस्ताकडे चालली आहे. दिवसभरात ९७ रुग्ण आढळून आले. तर २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९८.१० टक्के इतके आहे. आजपर्यंत ७७ लाख २३ हजार ५ ठणठणीत बरे झाले आहेत, तर ७ कोटी ८९ लाख ९ हजार ११५ कोरोना चाचण्या आजपर्यंत करण्यात आल्या. त्यापैकी ९.९८ टक्के म्हणजेच ७८ लाख ७२ हजार ३०० चाचण्यांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या राज्यात १ हजार ५२५ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात काल आढळलेली कोरोना रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे
मुंबई पालिका – २९
ठाणे पालिका – ०
ठाणे मनपा – २
नवी मुंबई मनपा – २
कल्याण – डोंबिवली पालिका – २
मीरा-भाईंदर – ०
वसई-विरार मनपा – ०
नाशिक – ४
नाशिक पालिका – ३
अहमदनगर – ६
अहमदनगर पालिका – ३
पुणे जिल्हा – ४
पुणे पालिका – १२
पिंपरी-चिंचवड पालिका – १३
सातारा – २
नागपूर पालिका – ०