breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई |

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कणकवली येथील सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी गुरुवारी फेटाळला. त्यामुळे नितेश यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश यांचे वकील अ‍ॅडम़् संग्राम देसाई यांनी या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. नितेश राणे अजूनही ‘संपर्क क्षेत्रा’च्या बाहेर असून उच्च न्यायालयात या प्रकरणी अनुकूल कौल मिळण्याची राणे कुटुंबीय व समर्थकांना आशा आहे. त्यामुळे तेथे निर्णय होईपर्यंत आमदार नितेश अज्ञातवासातच राहतील, अशी अटकळ बांधली जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे मात्र गुरुवारी दिवसभर कणकवलीत होते. त्यांनी कॉयर उद्योगाबाबत बैठकही घेतली. पण, पत्रकारांशी बोलताना नितेश यांचा अर्ज किंवा जिल्हा बँक  निवडणुकीबाबत काही टिप्पणी करण्यास नकार दिला.

आमदार नितेश यांच्यासह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटय़ा सावंत व मनिष दळवी यांनीही जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. पण पोलिसांना विशेष तपासाची आवश्यकता असून संशयितांचा मोबाईल हॅन्डसेट मिळवण्यासाठी हे अर्ज फेटाळल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात भाग घेण्यासही सावंत आणि दळवी यांना परवानगी नाकारण्यात आली. वेंगुर्ले येथे शेती संस्था मतदारसंघातून दळवी उमेदवार होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील माजी सरपंच संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला . त्यानंतर कणकवली पोलिसांनी हल्ला करून पळणाऱ्या पुणे येथील चौघांना ईनोवा गाडी सह फोंडाघाट नाक्यावर ताब्यात घेतले होते. या प्रकरणी एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, मनीष दळवी आदींची नावे तपासात समोर आली़ यामुळे पोलिसांनी आमदार राणे यांना नोटीस बजावली. या चौकशीला ते उपस्थित राहिले. मात्र अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. यावर सरकारी वकील प्रदीप घरत व आमदार राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दोन दिवस युक्तिवाद केला.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे हे या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.

  • बँक निवडणूक मतदान शांततेत

आमदार नितेश यांच्या अर्जावरील निर्णयाची गुरुवारी दिवसभर प्रतीक्षा असतानाच दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे मतदान तणावाच्या वातावरणात, पण शांततेने पार पडले. आज, शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. पण त्यापूर्वीच गुरुवारी सायंकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयासमोर फटाके वाजवून विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button