breaking-newsमहाराष्ट्र

#NisargaCyclone:निसर्ग चक्रीवादळाचा विदर्भावरही परिणाम

मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसण्याचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊसही होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर हे वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button