ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

नाना पटोलेंचे ‘वकिल’ सतीश उके ईडीच्या ताब्यात

जमिनीच्या व्यवहारांप्रकरणी कारवाईची शक्यता

नागपूर |  नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. ईडीचे पथक सेमिनरी हिल्स येथील कार्यालयात घेऊन गेले असल्याची माहिती समोर येत आहे. जमिनीच्या व्यवहारांबाबत ईडीने ही कारवाई केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अॅड.सतीश उके यांच्या पार्वतीनगर येथील घरी गुरुवारी सकाळी सक्तवुसली संचालनालयाने छापा टाकला होता. केंद्रीय राखीव पोलिसदलाच्या जवानांसह उके यांच्या घरी धडकले. पथकात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. सकाळपासून झाडाझडती घेतल्यानंतर ईडीने उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, उके यांच्या अटकेची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, सतीश उके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आऱोप केला आहे. एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी या कारवाईबाबत भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं सर्व झालं आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उके यांच्या आईंनी दिली आहे. मात्र, यापुढे प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळलं आहे.

भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून उके यांनी भाजप नेत्यांविरोधातन्यायालयात याचिका दाखल केल्या. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही ते भाजप नेत्यांवरआरोप करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील, अशीही त्यांची ओळख आहे. भूखंड व्यवहारातील आर्थिक प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने ही धाड टाकल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांपासून उके यांनी भाजप नेत्यांविरोधातन्यायालयात याचिका दाखल केल्या. तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनही ते भाजप नेत्यांवरआरोप करीत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील, अशीही त्यांची ओळख आहे.

‘भविष्यात नाना पटोलेंवर धाडी टाकल्यातरी आश्चर्य वाटणार नाही’

ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. ज्यांच्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचारावरती कारवाई होत नाही आणि जे माहिती देत आहेत. म्हणजे व्हिसल ब्लोअर आहेत. त्यांच्यावरती महाराष्ट्रात सातत्याने कारवाई केली जात आहे. खरं म्हणजे हा एक गंमतीचा विषय आहे. आता चितेंचा विषय राहिलेला नाही. चिंता करावी असा विषय राहिलेला नाही. तर गंमत करावी आणि गंमत पाहावी असा विषय झालेला आहे. आज मी नागपूरातल्या धाडीविषयी माहिती पाहिली. मला अनेकांनी नागपूरातून फोन केले. अनेक पत्रकारांनी फोन केले. काही वकिलांनी फोन केले. भविष्यात नाना पटोले यांच्यावरती धाडी पडल्या तरी मला आच्छर्य वाटणार नाही. कारण ते नाना पटोले यांचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button