देशात पुन्हा 45 हजारांपेक्षा अधिक रुग्ण संख्या
नवी दिल्ली– देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 45 हजार 083 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 35 हजार 840 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या कोरोनाचे 3 लाख 68 हजार 558 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिलीये . देशाचा रिकव्हरी रेट 97.53% झालाय. देशात आतापर्यंत 63.3 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 73.8 लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
केरळमधील स्थिती चिंताजनक
केरळमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून 30 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, फक्त पाच दिवसांमध्ये केरळमध्ये कोरोनाचे जवळपास दीड लाख रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील रुग्णसंख्या 45 हजारांच्या पुढे आढळून येत आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे.
#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
𝐂𝐎𝐕𝐈𝐃 𝐅𝐋𝐀𝐒𝐇https://t.co/P7RaHXos5x pic.twitter.com/QZ2np28A4F
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) August 29, 2021
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती
राज्यात मृत्यूचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत कमी झाला असून 126 रुग्ण दगावले. शुक्रवारी 170 रुग्ण दगावले होते. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1 लाख 37 हजार 226 इतका झाला आहे. दिवसभरात 4 हजार 831 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64 लाख 52 हजार 273 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढून 51 हजार 821 इतकी झाली. तर दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली असून 4 हजार 455 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 59 हजार 906 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.02 % एवढे झाले आहे