‘येणार तर मोदीच’; मोदी सरकारवर केलेल्या टीकेला अनुपम खेर यांचं प्रत्युत्तर
मुंबई – अभिनेते अनुपम खेर आणि ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्यामध्ये ट्विटरवर चांगलीच जुंपली. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी घाबरु नका, येणार तर मोदीच, असं उत्तर दिलं आहे.
साठच्या दशकाचा मुलगा म्हणून मी अनेक संकटं पाहिली आहेत. ज्यात 3 पूर्ण युद्धं, अन्नटंचाई, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. फाळणीनंतरचे हे आपल्यावरील सर्वात मोठे संकट आहे. मात्र भारताने कधीच सरकारचा अभाव पाहिलेला नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणीही जबाबदारी घेत नाही. हा प्रशासनाचा पराभव आहे, असं म्हणत शेखर गुप्ता यांनी सरकारवर टीका केली. याला अनुपम खेर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
शेखर गुप्ताजी, हे जरा अतीच झालं. अगदी तुमच्या स्टँडर्डपेक्षाही. कोरोना ही आपत्ती आहे. संपूर्ण जगासाठी. या महामारीचा सामना आपण यापूर्वी कधीच केला नव्हता. सरकारवर टीका करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर आरोप, टीका-टिपणी जरुर करा. पण कोरोनाशी सामना करणं ही आपलीही जबाबदारी आहे. तसं तर घाबरु नका. येणार तर मोदीच. जय हो, असं ट्वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.
दरम्यान, पुढच्या रविवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी ‘येणार तर मोदीच’ हा नारा दिला असल्याचं बोललं जात आहे.
आदरणीय @ShekharGupta जी!! ये कुछ ज़्यादा ही हो गया।आपके स्टैंडर्ड से भी।करोना एक विपदा है।पूरी दुनिया के लिए।हमने इस महामारी का सामना पहले कभी नहीं किया।सरकार की आलोचना ज़रूरी है।उनपे तोहमत लगाइए।पर इससे जूझना हम सबकी भी ज़िम्मेदारी है।वैसे घबराइए मत।आएगा तो मोदी ही!! जय हो!🙏 https://t.co/YZPzY4sVJh
— Anupam Kher (@AnupamPKher) April 25, 2021