ताज्या घडामोडीराष्ट्रिय
मन की बातमधून मोदींकडून गांधींचे स्मरण
नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 2022 या नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना स्मरण करताना मोदींनी म्हटले की, आज आपल्या बापूंची पुण्यतिथी असून 30 जानेवारीचा हा दिवस आपल्याला त्यांच्या शिकवणीची आठवण करून देतो.
तसेच मोदी पुढे म्हणाले की, काहीच दिवसांपूर्वी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. दिल्लीत राजपथावर आपण देशाच्या शौर्याच्या आणि सामार्थ्याच्या चित्ररथांचे संचालन पाहिले. त्यामुळे सर्वांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारत कोरोना विरोधातील लढाई अंत्यत यशस्वीपणे लढत आहे. देशात 4.5 कोटी मुलांनी कोरोना लस घेतली आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे नरेद्र मोदींनी सांगितले.