#ManaseImpact: रावेत मध्ये पवनामाईला जलपर्णीचा विळखा; मनसेच्या तक्रारीची घेतली पालिका प्रशासनाने दखल
पिंपरी |
आपल्या रावेत मध्ये पवना नदीची वाईट अवस्था झालेली आहे. नदीपात्र जलपर्णी ने झाकले गेलेले असून, जलपर्णी काढून नदीला मूळ रूपात परत आणा अशा आशयाचे निवेदन मनसे युवानेते प्रविण माळी यांनी आरोग्य अधिकारी गेंजे यांना दिलेले होते.
शहरे वाढून नद्यांना नाल्याचे स्वरूप आलेले आहे अशात अनेक ठिकाणाहून रसायन, कचरा मिश्रित पाणी पवना नदीत मिसळून जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. मनपाकडून नद्यांच्या संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काहीही कारवाई होत नाही ही बाब वारंवार पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांना सांगून देखील जलपर्णी काढण्यात येत नाही. नमामी गंगेच्या धर्तीवर नमामी पवना सुरू करण्याची आवश्यकता आहे आणि नद्यांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे.
मनपाने याबाबत पुढाकार घेऊन आपल्या रावेत मध्ये या मोहिमेचा प्रारंभ करून नद्यांच्या बाबतीत प्रशासन गंभीर आहे याची जाणीव नागरिकांना करून देणे गरजेचे आहे. जलपर्णी काढल्यानंतर नदीचे पाणी स्वच्छ होऊन त्याचा जनसामान्यांना वापर करता येईल तसेच आजारांना देखील आळा घालता येणे शक्य होईल. तरी वरील सर्व बाबी विचारात घेता लवकरात लवकर कामाला सूरुवात व्हावी अन्यथा प्रशासनास मनसे च्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलेला होता. त्यावर आता प्रशासनाने दखल घेतलेली आहे. त्यावर आता जलपर्णी हटवण्याचे काम सुरु झालेले आहे.
वाचा- #Covid-19: जगभरात कोरोनाचा आकडा 103.3 मिलियनवर पोहचला असून मृत्यूचा आकडा 2.23 मिलियन वर